पुण्यामधील येरवाडा भागातील गुंजन चौकात एका चारचाकी गाडीने आज भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीला आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्याता आली आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज(सोमवार) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्याहून दोन जण चारचाकी वाहनातून (एमएच १६ एचटी ३७१३) नगरच्या दिशेने जात निघाले होते. दरम्यान, येरवडा येथील गुंजन चौकात ते आल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी मधील दोघेजण गॅरेजवाल्याला आणण्यासाठी गेले होते. ते गॅरेजवाल्याला घेऊन येत असताना, काही क्षणात गाडीने पेट घेतला.

साधारण सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, काही वेळात अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत चारचाकी वाहन आगीत जळून खाक झाले होते.