शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. चारही धरणांमध्ये २८.९२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ७० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी ४१ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या सहा मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture and drinking water concerns are over for the year pune print news amy
First published on: 16-08-2022 at 10:11 IST