विकासाच्या आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सरकार आम्हाला शिरुरच्या विकासासाठी सहकार्य करत नाही असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. शिरुर या ठिकाणी हल्लाबोल ची सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. शिरुर या ठिकाणी विमानतळ बांधावा म्हणून पाठपुरावा करतो आहोत पण पालकमंत्री गिरीश बापट लक्ष देत नाहीत असेही पवार यांनी म्हटले आहे. शिरुर भागाच्या विकासासाठी इथे विमानतळ बनवण्याकरिता आम्ही पाठपुरावा करतोय. पण सरकार हवं तसं सहकार्य करत नाही. पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे शिरुर परिसराच्या विकासकार्यासाठी काहीच करत नाहीत. #HallaBol pic.twitter.com/jCrwSXB29H — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 10, 2018 याच सभेत अजित पवार यांनी गॅस दरवाढीवरही टीका केली. सिलिंडरच्या किंमती ८०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. विकास करताना सरकार अशा प्रकारे महागाईला खतपाणी घालते आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला.