पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे यंदा ऑगस्टच्या मध्यालाच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या पाच वर्षांत सन २०१९ चा अपवाद वगळता एवढ्या लवकर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. यंदा चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या चारही धरणांत मिळून २९.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली होती. तसेच पूर्वमोसमी पावसाने यंदा हजेरी लावली नाही. याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरूवातीला चारही धरणांमधील पाणीसाठा २.५५ टीएमसी म्हणजेच के‌वळ ८.७५ टक्के शिल्लक राहीला होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या परिसरात ४ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर केवळ सहा दिवसांत म्हणजेच ११ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हंगामात प्रथमच धरण भरल्यापासून मुठा नदीत गेल्या सहा वर्षातील लवकर सुरू करण्यात आलेला विसर्ग ठरला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वरसगाव आणि पानशेत ही महत्त्वाची धरणे भरली, तर टेमघर धरणात ९७ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All the four dams supplying water to pune city were filled to their full capacity in mid august itself pune print news msr
First published on: 18-08-2022 at 10:18 IST