पुणे :पुणे शहरातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात दारू आणून न दिल्याच्या रागातून दोघा जणांनी एका तरुणाचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपाल आचार्य (वय 30 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अमीर शेख आणि दानीश अली शेख (दोघेही रा. काशेवाडी ) असे आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल आचार्य या तरुणाला आरोपी अमिर शेख याने दारू आणण्यास सांगितली.मात्र गोपाल आचार्य याने दारू आणण्यास नकार दिला.त्या रागातून आरोपी दानिशने गोपालला घराबाहेर बोलावून घेतले.तू माझ्या चाचाला दारू आणून का दिली नाही,अशी विचारणा करून त्याचे डोके भिंतीवर आपटले.त्यानंतर अमीर शेख आणि दानिस शेख यांनी गोपालला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेत गोपाल आचार्य हा गांभीर जखमी झाल्याची घटना घडली.त्यावर तत्काळ गोपाल आचार्य याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर या प्रकरणाचा तपास खडक पोलिस करित आहे.