पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाहीत. बंद खोलीत पण चर्चा नाही आणि खुल्या उद्यानामध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, अशी काही संधी नाही. पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, अशी टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.

ईव्हीएम विरोधात विरोधक एकत्र आले असून शरद पवार यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली, याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचा विजय झाला तर त्यांना ईव्हीएम आठवते. कसबा जिंकले तर त्यांना ईव्हीएम आठवले नाही का? मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूमध्ये फकल लागल्यामुळे टीका होत आहे. त्यावर पाटील म्हणाले, मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले म्हणजे काय लगेच हिंदुत्व सोडले असे होत नाही. मुस्लीम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केले असेल म्हणून मालेगावमध्ये फलक लागले असतील.

Election Commission guidelines about Rahul Gandhi Abhishek Banerjee choppers searches
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

हेही वाचा >>> वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन

महापालिका प्रकल्पांसदर्भात सोमवारी सहा बैठका

पुण्यातील वृक्षतोडीकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेशी जोडलेल्या विविध प्रकल्पांबाबत सोमवारी (२७ मार्च) सहा बैठका घेणार आहे. त्यामध्ये मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा या विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये वृक्षतोड विषय पण घेणार आहे.