पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह शनिवारी पुण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले आहेत.

महाराष्ट्रात आले तर राज ठाकरे यांना भेटणार का?, या प्रश्नावर बृजभूषण सिंह म्हणाले, की राज ठाकरे मंचावर आले, तर त्यांना नक्की भेटणार. त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. ते आले तर त्यांची भेट घेऊ. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला होता. मात्र, राज ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्रात येण्यावर विरोध केला नाही. यावर देखील बृजभूषण यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या खासदाराच्या विरोधात भाजपकडून संभ्रम

बृजभूषण सिंह म्हणाले, की कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहीत नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, ते दिवसे गेले. महाराष्ट्र नेहमी कुस्तीचे राज्य राहीले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी जगाच कुस्तीचे सर्वात पहिले मैदान महाराष्ट्रात बनवले. तेव्हापासून आजपर्यंत कुस्तीचे मोठे नाव आहे. महाराष्ट्रात लाखो प्रेक्षक येतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे, असेही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.