पुणे : पुणे जिल्ह्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून (१८ एप्रिल) ही भाडेवाढ लागू होणार असून, पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडेदर २१ रूपये करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती) बैठकीत खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी १८ एप्रिल ते १६ जून २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित वाहने मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सादर करावीत. सुधारित भाडेदर १८ एप्रिलपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेणाऱ्या टॅक्सीधारकांसाठी लागू राहणार आहे.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा…. पुणे: मौजमजेसाठी दुचाकी चोरी; बीडमधील चोरट्यांकडून दहा दुचाकी जप्त

मीटर पुन:प्रमाणीकरण न केल्यास कारवाई

दिलेल्या मुदतीत मीटर पुन:प्रमाणीकरण करून न घेणाऱ्या टॅक्सीधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर पुन:प्रमाणीकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन होईल. मात्र सात दिवसांपुढील विलंबासाठी कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा पर्याय निवडल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये शुल्क असेल. किमान तडजोड शुल्क ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.