पुणे : जम्मू-काश्मिरमधील उरी, तंगधार, राजौरी आणि पूंछ या सीमेवरील भागांत पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी ‘सरहद’ संस्थेने मदतीचा हात दिला आहे. या भागांमध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तर २० हजारहून अधिक लोक या भागातून बाहेर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरहद या पुणे स्थित संस्थेने या युद्धग्रस्त नागरिकांना तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

या मदतकार्याचे नेतृत्व सरहद संस्थेचे काश्मीरमधील समन्वयक आदिल मीर, सिराज खान आणि मुश्ताक खोझा हे करत आहेत. हे तरुण आधी पहलगाम हल्ल्यानंतर मराठी पर्यटकांना मदत करण्यासाठी पुढे आले होते. आता तेच गावोगावी स्वयंसेवकांना एकत्र करून अन्न, कपडे आणि निवारा पुरवण्याचे काम करत आहेत. याबाबत संस्था तेथील प्रशासनाच्या संपर्कात असून स्थानिक मशिदी, तसेच मंदिरांमध्ये अशा कुटुंबांना आश्रय देण्याबाबत आदेश काढण्याची विनंती केली आहे.

सध्या सोपोरमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिल मीर यांनी आपल्या घरी उरीतील नाम्बला गावासह राजौरी आणि पूंछमधील अनेक विस्थापित कुटुंबांना निवारा दिला आहे. संकटाच्या या काळात त्यांचे घरच अनेकांसाठी आधार बनले आहे. या भागात संस्थेच्या वतीने गरज पडल्यास लष्कराच्या परवानगीने मदत छावणी उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

आदिल मीर हे सध्या काश्मीरमधील सरहदच्या मदत उपक्रमाचे प्रमुख समन्वयक आहेत. तर दर्दपोरा (कुपवाडा) येथे मुश्ताक खोझा आणि अरागम (बांदीपोरा) येथे सिराज खान स्थानिक पातळीवर मदतीचे नेतृत्व करत आहेत.

मदतीसाठी व माहितीसाठी संपर्क

आदिल मीर – सरहद मदत समन्वयक (सोपोर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैभव वाघ – सरहद, महाराष्ट्र,समन्वयक