पुणे: वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी) नागरिकांना घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नागरिकांना यासाठी टपाल विभागात आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अखेर दोन्हीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांना आरटीओतील एजंटाना पैसे देऊन हे काम करून घ्यावे लागत आहे.

वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र आरटीओकडून संबंधित व्यक्तीच्या घरी त्याच्या पत्त्यावर पाठविले जाते. ते मिळाले नाही म्हणून दररोज अनेक नागरिक आरटीओमध्ये चौकशीसाठी येतात. तिथे त्यांना टपाल विभागाकडे असल्याचे सांगितले जाते. नागरिक टपाल विभागातही चौकशीसाठी जातात त्यावेळी आरटीओकडे पाठविल्याचे सांगितले जाते. या सर्व गोंधळात नागरिकांना तब्बल वर्षभरानंतरही परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र आहे.

migrant workere new law mea
विदेशात काम करणाऱ्या दीड कोटी भारतीयांसाठी नवा कायदा लागू होणार? परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन विधेयकात काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Contractual electricity meter readers protest splits
कंत्राटी वीज मीटर वाचकांच्या आंदोलनात फूट! नागपूरसह काही जिल्ह्यात…
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam : ‘एमपीएससी’ची ४० लाखांत प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Neelam Gorhe, 8 class Pass Method ,
आठवीपर्यंत नापास न करणारे सरकार जनतेकडून नापास; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?

हेही वाचा… राज्यातील दीड कोटी निरक्षर शोधण्याचे लक्ष्य; केंद्र सरकारचे नवभारत साक्षरता अभियान, शिक्षकांवर नवा ताण

अखेर नागरिक आरटीओ एजंटाकडे याबाबत विचारणा करीत आहेत. यानंतर एजंट दोन ते अडीच हजार रुपये घेत आहेत. त्यानंतर नागरिकांना त्यांचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत आहे. परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच न मिळण्यात चुकीचा पत्ता कारणीभूत असल्याचा दावा आरटीओ आणि टपाल विभागाकडून केला जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक त्यावर असताना संबंधित नागरिकाशी संपर्क करून ही कागदपत्रे त्याच्या हवाली का केली जात नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

परिवहन आयुक्तांकडे मागणी

परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र छपाई केंद्राच्या बदललेल्या धोरणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. राज्यभरात लाखो परवाने व वाहन नोंदणी प्रमाणपत्रे नागरिकांना अद्याप मिळालेली नाहीत. संपूर्ण राज्यात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे केली आहे.

संबंधित व्यक्तीचा पत्ता सापडला नाही तर असे परवाने आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रे परत आरटीओमध्ये येतात. पत्ता न सापडल्याने ती परत येण्याचे प्रमाण केवळ अर्धा टक्का आहे. लवकरात लवकर नागरिकांपर्यंत ही कागदपत्रे घरपोच पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

पत्ता न सापडल्याने वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र परत येण्याचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे. परत आलेली ही कागदपत्रे नागरिकांना देण्यासाठी पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयात केंद्र सुरू केलेले आहे. तिथून नागरिक त्यांची ही कागदपत्रे घेऊन जाऊ शकतात. आम्ही ही कागदपत्रे पोहोचविण्याला नेहमीच प्राधान्य देतो. – एस.पी. दळवी, व्यवस्थापक, टपाल व्यवसाय विभाग

Story img Loader