उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे या भागात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसांतील थंडी मंदौस चक्री वादळाने हिरावून घेतली होती. मंदौस चक्री वादळाचा परिणाम आता पूर्णपणे ओसरला आहे.

हेही वाचा >>>पुणे: ‘एनआरडीसी’च्या लोकसंपर्क केंद्राची पुण्यात स्थापना; नवउद्योग, संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न

Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट

उत्तर भारतात एका पाठोमाग एक संचलनित असलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामामुळेच सध्याचे महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान गेल्या दोन दिवसांपासुन हळूहळू घसरत आहे. तरीदेखील अजूनही कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने जास्तच आहे. मात्र, आता त्यामध्ये घसरण होऊन रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून (२० डिसेंबर) संपूर्ण राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन दहा अंश सेल्सिअसपर्यंत, तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित दहा-बारा दिवसांत थंडीत चांगलीच वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.