पिंपरी/ पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या लोकांचे ऐकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येते. त्यांना ऐकावे लागेल. अन्यथा गडबड होईल, असे विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी भोसरीत केले. दिल्लीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. आज ना उद्या, शिवसेनेला दिल्लीवर राज्य करायचे आहे, असे सांगतानाच आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचेही ते म्हणाले.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरीत झालेल्या  मेळाव्यात ते बोलत होते.