दत्ता जाधव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
पुणे : मागील खरीप आणि रब्बी हंगामात अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात ६९ लाख ११ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील ४७ टक्के पिकांची हानी केली आहे.कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यांत ६६ लाख ३१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यातही जून ते ऑगस्ट या काळात ३३.५२ लाख आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या परतीच्या मोसमी पावसाच्या काळात ३२.७९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 30-05-2023 at 02:07 IST