अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांचे मत; ‘पैसा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पैसा साठवला की तो कुजतो आणि गुंतवला तर तो वाढतो. दुर्दैवाने मराठी माणसाला पसा साठवायला आवडत असल्याने मराठी माणूस धनवान होऊ शकत नाही. भारतात सोन्यामध्ये पैसा गुंतवला जातो. मात्र त्याचा कुणालाही उपयोग होत नाही, हे वास्तव आपण मान्य करत नाही. भारतात केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदू शकतात, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी व्यक्त केले. मनोविकास प्रकाशनतर्फे अतुल कहाते यांच्या ‘पैसा ‘ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन घैसास आणि प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी घैसास बोलत होते. प्रकाशक अरिवद पाटकर या वेळी उपस्थित होते. घैसास म्हणाले,की भारत गरीब असता तर परदेशी राज्यकर्त्यांनी इतकी वर्षे आपल्यावर राज्य केले नसते. अंथरूण पाहून पाय पसरावे, पसा हे अंतिम सुख नाही, यांसारख्या अनेक पारंपरिक शिकवणीमुळे पसा किती प्रमाणात मिळवावा याविषयी लोकांमध्ये गरसमज आहेत. संतांची शिकवण समाजासाठी योग्यच आहे, पण आíथक प्रगती आणि विकासाचा विचार केला तर ही शिकवण कधी उपयोगात आणायची हे समजायला हवे. श्रीमंत आणि धनवान या दोन गोष्टींची आपण नेहमी गल्लत करतो. श्रीमंत म्हणजे सर्वच बाबतीत धनवान आणि धनवान म्हणजे केवळ पशाने धनवान हे समजून घेतले पाहिजे. गोडबोले म्हणाले,‘ सध्याची अर्थव्यवस्था भविष्यात पसा ही संकल्पना नष्ट करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ई- पेमेंट, बीट कॉइन्सचे वाढते महत्त्व यातून पसा अदृश्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात आपण पशाला हातही लावू शकणार नाही.’ कहाते यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकलेखनामागची भूमिका सांगितली.