पुणे : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा केला असताना, जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ६५ गावांसाठी सहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी कृष्णा नदीवरील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 या योजनेचा आराखडा, प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे (स्टेट लेवल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी कमिटी – एसएलटीए) पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळणार असून त्यानंतर राज्य शासनाची मान्यता मिळणार आहे. बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा केला आहे. तसेच ‘महाराष्ट्रातील कन्नड भाषक सोलापूर आणि अक्कलकोट हे भाग कर्नाटकात यायला हवेत, ’ असे आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.

More Stories onपाणीWater
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion of the maisal scheme approved soon water to 65 villages in jat pune news ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST