महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारताबाबत सामान्य परिस्थितीत अगदी गल्लीतही भांडणं होतात, नेते मंडळी खूप भांडतात, असं निरिक्षण नोंदवलं. इतरवेळी धर्मावरून लढतील, पण संकट येताच सगळे एकत्र येतात, असंही यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी नमूद केलं. ते लोणावळा येथे करोना योद्ध्यांचा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी बोलत होते. लोणावळ्यात स्वच्छता दूत आणि करोना योद्ध्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार्थींमध्ये सर्व धर्मियांचा समावेश होता.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “कोरोना काळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केलं आहे. हे आपल्या देशाच सौभाग्य आहे. सामान्य परिस्थिती असेल तर अगदी गल्लीतही भांडणं होतात. नेते मंडळी तर खूपच भांडतात. लोकशाही आहे. मात्र, देशावर पाकिस्तान, चीनमधून संकट येवो अथवा करोनासारखं संकट येताच सगळे एकत्र येतात आणि काम करतात.”

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

हेही वाचा : “कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा…”, राज्यपालांच्या विधानावर शरद पवारांचं शरसंधान!

“इतरवेळी धर्माच्या आणि इतर कारणांवरून लढतील, पण संकट येताच सगळे एकत्र येतात. ‘हम सब एक है’. यापुढे जाऊन आता आपण सगळे नेहमी एकत्र राहू असा प्रयत्न करायला हवा. जेणेकरून संकट येऊच नये. यासाठी आपण सर्वजण सजग राहिले तर लोणावळा एक आदर्श निर्माण करेल,” असंही राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं.