माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महासत्ता आहे हा निव्वळ भ्रमच आहे. आपण अजूनही कोिडगमध्येच अडकलो आहोत. संगणकाचे उत्तम ज्ञान असलेली मंडळी अजूनही कमीच आहेत, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे शोभा बोंद्रे आणि सतीश जोशी यांनी लिहिलेल्या ‘सहावं महाभूत आणि मी!’ या पुस्तकावरील चर्चेत ते बोलत होते. बोंद्रे यांनी गोडबोले आणि जोशी यांच्यासह मायक्रोसॉफ्ट कंपनीतील माजी वरिष्ठ अधिकारी मकरंद गद्रे यांच्याशी संवाद साधला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माहितीचा खजिना या चर्चेतून खुला झाला. अशोक कोठावळे यांनी सर्वाचे स्वागत केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India superpower in information technology is purely myths says achyut godbole
First published on: 14-05-2017 at 02:58 IST