पुणे : अरबस्तानच्या बाहेर आलेला इस्लाम आणि रोमच्या बाहेर आलेला ख्रिस्ती धर्म आध्यात्मिक कमी आणि राजकीय अधिक होता. भारतावर झालेले अरबी आक्रमण हे राक्षसी आणि रानटी होते. इस्लामचे सर्वभक्ष्यी स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. मंदिरे तोडण्यामागे उद्दामपणा होता. इस्लामी राजवटीला पहिला यशस्वी विरोध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 श्रीशैलम (आंध्रप्रदेश) येथील श्री शिवाजी मेमोरियल कमिटी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीने डॉ. केदार फाळके लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा- स्वराज्य ते साम्राज्य १६००-१८१८’ या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी भागवत बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कमिटीचे सचिव जी. रघुरामय्या, उपाध्यक्ष उदय खर्डेकर आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘दि लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी-किंगडम टू एम्पायर १६००-१८१८’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनही भागवत यांच्या हस्ते झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Islam christianity political statement sarsanghchalak mohan bhagwat ysh
First published on: 28-06-2022 at 02:01 IST