देशाच्या पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य समान असले पाहिजे. त्यांनी सर्व राज्यांकडे मुलासारखे पाहिले पाहिजे. मी गुजराती म्हणून गुजरातला प्राधान्य देता कामा नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली. महाराष्ट्र सर्वार्थाने पुढे आहे. एखादे दोन उद्योग गेले म्हणून काही नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा- “…म्हणून मी हल्ली फार बोलत नाही”, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं परखड मत

What Devenddra Fadnavis Said?
उद्धव ठाकरेंना भाजपाची ऑफर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ज्यादिवशी ते…”
sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
jitendra awhad Prakash Ambedkar
वंचितची मविआकडे ४८ पैकी २७ जागांची मागणी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर…”

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावर राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर आणि पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचा- राज ठाकरेंनी सोशल मीडियावर कमेंट्स करणाऱ्यांची घेतली फिरकी; म्हणाले, “त्यावर आता…!”

‘लाव रे तो व्हिडीओ ते भोंगाबंदी’ हा ‘यू-टर्न’ नाही का?’, या प्रश्नावर प्रत्येक गोष्टीला विरोध करायलाच हवा का?, असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला. कालपर्यंत एकमेकांना शिव्या घालणारे अडीच वर्षे सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसले होते त्यांना किंवा सकाळी सहा वाजता राजभवनवर जाऊन शपथ घेतली त्यांना असे का नाही विचारत?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ३७० कलम रद्द करणे आणि रामजन्मभूमी या विषयांमध्ये मी सरकारचे अभिनंदन केले आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.