नारायणगाव : ‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास शिरूरचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्पाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्पोक- जीएमआरटी’ येत असल्याने त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्यावर तोडगा काढावा अन्यथा मार्ग बदलण्याच्या निर्णयाविरोधात लढा उभारावा लागेल, अशी भूमिका डॉ. कोल्हे यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय

pune nashik railway news in marathi
पुणे नाशिक मार्ग रेल्वेकडूनच! रेल्वे व्यवस्थापकांकडे माहितीच नाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
cidco protest for water news
नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Crowd of devotees take bath in Ramkund due to Mauni Amavasya
नाशिक : मौनी अमावास्येमुळे रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू

‘पुणे-नाशिक या ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आला असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीरे केले आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सवा’च्या समारोपावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी मार्ग बदलण्यास विरोध दर्शविला. ‘जीएमआरटी’ प्रकल्पामुळे या भागात उद्योग व्यवसाय, कारखाने उभे राहू शकत नाहीत.

हेही वाचा >>> उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यची अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडीत आणि शेती व्यवसाय केंद्रीत झाली आहे. शेतमाल उत्तर आणि दक्षिण भागातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी कमी खर्चिक रेल्वे प्रकल्पाची आवश्यकता आहे. गेल्या तीस वर्षात शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असताना जीएमआरटीमध्ये नवीन तंत्रज्ञान अद्याप का अवगत झाले नाही, हा प्रश्न आहे. जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असून हा प्रकल्प तालुक्यात कायम राहिला पाहिजे. मात्र त्यासाठी रेल्वे प्रकल्पही महत्त्वाचा असून त्यासंदर्भात ‘जीएमआरटी’च्या शास्त्रज्ञांनी तोडगा काढला पाहिजे, असे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत तोडगा न निघाल्यास आणि मार्ग बदलण्यात आल्यास त्याविरोधात लढा उभा केला जाईल, असा इशाराही डॉ. कोल्हे यांनी दिला.

Story img Loader