रावेत बंधाऱ्यापासून ते चिंचवडच्या मोरया गोसावी घाटापर्यंत कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट पवना नदीपात्रात सोडले जात असून त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, अशी तक्रार खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. खासदार बारणे यांनी याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले आहे.    

हेही वाचा >>> पुणे : नाताळ साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या सदनिकेतून २५ लाखांचा ऐवज चोरीस; महंमदवाडीतील घटना

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

पवना नदी क्षेत्रातील केजुदेवी बंधाऱ्याजवळ नुकतेच मोठ्या संख्येने मृत मासे आढळले आहेत. नदीपात्रातील पाणी दूषित आहे. ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते आहे. पवना नदीपात्रातील पाणी हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्यासाठी वापरले जाते. नदीपात्रातील पाणी अशुद्ध होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी आयुक्तांना या पत्राद्वारे केली आहे.