पुणे : १ जून ते ३० सप्टेंबर या काळात राज्याची सरासरी ९९४.५ मिमी असताना ९६५.७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी पाऊस झाला असला तरी राज्यातील नऊ जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले असून सांगलीमध्ये सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे.
सांगलीमध्ये सरासरी ४८६.१ मिमी पाऊस पडतो, यंदा केवळ २७२.७ मिमी पाऊस झाला आहे. सांगलीच्या पश्चिम शिराळा, वाळवा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी भागात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे. सातारा
हेही वाचा >>> Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
विभागनिहाय स्थिती
कोकण विभागात २८७०.८ मिमी सरासरी पाऊस पडतो, यंदा ११ टक्के जास्त, ३१७७.६ मिमी पाऊस झाला. मात्र रत्नागिरीत २ टक्के कमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात १२ टक्के तर मराठवाडय़ात ११ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात २ टक्के पावसाची तूट आहे.
रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine maharashtra districts receives less than average rainfall in this year zws