पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती जाहीर करण्यातील लपवाछपवीबाबत वीज नियामक आयोगाकडे तक्रार दाखल होताच महावितरणला जाग आली. पाच महिन्यांपासून जाहीर न केलेली माहिती एका दिवसात समोर आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एका महिन्यात बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना घडल्याचे वास्तव आणि महावितरणचा कारभार त्यातून समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार महावितरणला प्रत्येक महिन्याला सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, अनेकदा ते जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची बाब वेळेवेळी समोर आली आहे. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२२ नंतरचे निर्देशांक प्रसिद्धच केले नव्हते. ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. गुरुवारी त्यांनी याबाबत आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. ही तक्रार दाखल होताच महावितरणला जाग आली आणि संध्याकाळी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे विश्वासर्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 30 thousand incidents of power failure in maharashtra in one month mahavitaran pune print news zws
First published on: 19-08-2022 at 20:04 IST