पिंपरी-चिंचवडमधील अभिनेत्री आर्या घारे हिने आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. याद्वारे घारे कुटुंबियांनी अंधश्रद्धेचा निषेध करत नवीन विचारांचा पायंडा पाडला. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. आर्या घारे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र, कुटुंबीय उपस्थित होते. आर्या हिने देऊळबंद, पोश्टर गर्ल, भिरगीट, अ.ब.क, बॅक टू स्कूल, परफ्युम, 66 सदाशिव अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आर्या घारे व तिची आई वैशाली घारे या अंधश्रद्धा, रूढी परंपरा दूर सारण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यामुळेच दरवर्षी आर्या हिचा वाढदिवस अशाच अभिनव उपक्रमातून साजरा केला जातो. आज स्मशानभूमीत साजरा झालेला वाढदिवस हा देखील अशाच एका परिवर्तनवादाचा दृष्टिकोन असल्याचे आर्याची आई वैशाली घारे यांनी सांगितले.

ही संकल्पना आईला सुचली –

“अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा, ही संकल्पना आईला सुचली. दरवर्षी वेगळ्यापद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या आईचा मला अभिमान वाटतो.” असे आर्या घारे यावेळी म्हणाली.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

…मग स्मशानभूमी अपवित्र कशी? –

पुढे ती म्हणाली की, “अंधश्रद्धेवर अनेक लोक खूप विश्वास ठेवत आहेत. नागपुरात पाच वर्षीय चिमुरडीला अंधश्रद्धेपायी जीव गमवावा लागला. अशा घटना ऐकल्यानंतर आपण वाहून जातोय अस वाटलं. म्हणून अशा गोष्टींना तडा देण्यासाठी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याच ठरवलं. श्रीमंत असो किंवा गरीब त्याचा शेवट हा इथेच होतो. स्मशानभूमी हेच अंतिम सत्य आहे. इथून देहाला मुक्ती मिळते, मग स्मशानभूमी अपवित्र कशी?, तरुणांनी पुढे येऊन अंधश्रद्धा थांबवली पाहिजे, श्रद्धा असू द्या पण ती अंध नसावी.” असं देखील आर्या म्हणाली.