पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना चार दिवसांमध्ये घडलेल्या सहा खुनाच्या घटनांचे गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, त्या कमीच आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, जोपर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सामाजिक घटना नाहीत असं विधान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्ण प्रकाश म्हणाले की, खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, कमीच आहेत. खून व्हायला नाही पाहिजेत, या मताचा मी आहे. नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकत नाही. आत्ता झालेल्या खुनाच्या घटना या सामाजिक नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर बाहेरील लोक कामासाठी आले. त्या लोकांमध्ये वाद विवाद होतात यातून अशा घटना घडत आहेत. त्यामुळं समाजात भीती बाळगण्याचे कारण नाही. या घटना व्यक्तिशः आहेत, असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. पुढे ते म्हणाले की, अशा घटना कायद्याच्या भीतीने संपत नाहीत. कायदा अवगत असेल तर भीती असते. रागात नसतो तेव्हा कायद्याची भीती असते अशी उदाहरणे त्यांनी दिली आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad krishna prakash police officer murders in pimpri chinchwad crime in pcmc area vsk 98 kjp
First published on: 24-09-2021 at 13:12 IST