आषाढी वारी निमित्त श्रिया क्रिएशन निर्मित कैवल्य वारी या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला. आषाढी वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणारी भक्तिगीते या कैवल्य वारीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. संगीत क्षेत्रातील नामवंत गायकांच्या आवाजात यातील सर्व १० गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कैवल्य वारी या अल्बममधील गाणी प्रासंगिक आणि रसाळ आहेत. यातील संतांच्या पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील अर्थ, भावना, स्वरांमध्ये अंतरमनाला भिडणारे सामर्थ्य आहे, असे उद्गार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले. संतांच्या पालखी प्रस्थानापासून पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत वारी मार्गावर प्रत्येक टप्प्याला महत्व आणि मुक्कामाला अर्थ आहे. या गाण्यातील सुंदर स्वरातून ते अभिप्रेत होते. तुकोबांच्या अभंगात सर्व विषय सामावलेले आहेत. त्यात संगीत, गायनाचा समावेश आहे. अशा संतांच्या पालखी सोहळ्यातील वातावरण, प्रसंग या अल्बमच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Release of the devotional song album kaivalya wari by shriya creation in pune asj
First published on: 03-07-2022 at 10:24 IST