पुणे : ‘राज्यात नव्याने जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा नसेल. तसा कोणताही प्रस्ताव नाही. या अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती येथे मंगळवारी केले. राज्यात नव्याने काही जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असून बारामती हा स्वतंत्र जिल्हा असेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमातून होत आहे.

हेही वाचा >>> शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती

Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
C P Radhakrishnan emphasized combining education technology and research for developed agricultural sector
अकोला : ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची जागतिकस्तरावर मोठी झेप, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?

टेंभुर्णी येथील एका खासगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले असताना माजी महसूलमंत्री आणि विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली. त्या वेळी त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. पालकमंत्रिपदाची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले,‘पालकमंत्रिपदाबाबत कुठेही नाराजी नाही. महायुतीचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच महायुतीला जनादेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. यासंदर्भात महायुतीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. गावी गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते नेहमीच गावी जातात. त्यामुळे ते नाराज असण्याचा प्रश्नच नाही.

Story img Loader