पुणे  : नवरात्रीच्या उपवासांमुळे साबुदाणा, वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणी वाढूनही किरकोळ बाजारात साबुदाणा तीन ते चार रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याचे दर स्थिर आहेत. पौष्टिक तृणधान्य म्हणून वरई खाण्यास लोक पसंती देत असल्यामुळे वरईच्या दरातील तेजी टिकून आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  देशात तामिळनाडूमधील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणाचे उत्पादन घेतले जाते. येथे तयार होणारा साबुदाणा संपूर्ण देशात विक्री होतो. यंदा स्थानिक उत्पादकांनी अचानकपणे साबुदाण्याचे भाव वाढविले होते. मात्र, भाववाढीनंतर मागणी घटली होती, त्याचा परिणाम म्हणून भाव कमी करण्यात आले. मागील पंधरा दिवसांत किलोच्या भावात तब्बल पंधरा रुपयांनी घसरण झाली आहे. पुणे बाजार समितीत सध्या दररोज सरासरी १०० टन साबुदाण्याची आवक होत असल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. नवीन शेंगदाण्याची कर्नाटक आणि गुजराथ येथून आवक सुरू झाली आहे. मात्र, ती अतिशय कमी आहे. येत्या पंधरावडय़ात आवक वाढेल. त्यामुळे नवरात्रीनंतर भावात घट होण्याची शक्यता आहे. सध्या वाढलेल्या भावानेच ग्राहकांना शेंगदाणे खरेदी करावे लागणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sago groundnut stable demand increased navratri in the retail market ysh
First published on: 28-09-2022 at 00:02 IST