महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सोळाशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामांची निविदा पारदर्शीपणे राबविण्यासंदर्भात नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. या पत्रामुळे या योजनेत गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांना एकप्रकारे पुष्टी मिळत आहे. प्रारंभीपासून ही योजना वाद आणि आरोप-प्रत्यारोपात अडकली. या योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची चौकशीही करण्याचे आदेश देण्यात आले असून फेरनिविदा काढण्याची नामुष्की प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर आली आहे. त्यामुळेच नियोजित कालावधीत ही योजना पूर्ण होणार का, हाच प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराची भौगोलिक परिस्थिती, पाणी वितरणातील त्रुटी आणि असमानता लक्षात घेऊन समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुदान मिळणार असल्यामुळे या योजनेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र प्रारंभीपासूनच ही योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली. आधी राजकीय वाद आणि नंतर प्रशासकीय चौकशी पाहता पुढील पाच वर्षांत ही योजना पूर्ण होणार का, असाच प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे ही बाबदेखील अधोरेखित होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scheme for equal distribution of water in pune will complete in time
First published on: 24-10-2017 at 04:01 IST