scorecardresearch

Premium

पुणे: सत्ता कोणासाठी, कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे वस्तुपाठ; शरद पवार यांचे गौरवोद्गार

या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांनी घराण्याच्या नावाने राज्य केले. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले.

sharad pawar
( शरद पवार)

पुणे : या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांनी घराण्याच्या नावाने राज्य केले. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले. सत्ता कोणासाठी आणि कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श वस्तुपाठ आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी काढले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने लाल महाल येथे आयोजित ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शरद पवार बोलत होते, पवार यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर, पत्रकार ज्ञानेश महाराव, शीतल पवार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आबेदा इनामदार, आमदार संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे, तुषार महाराज शिंदे आदींना पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, रोहित टिळक, मोहन जोशी, रमेश बागवे आणि समितीचे विकास पासलकर या वेळी उपस्थित होते.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. शौर्य आणि कष्टाच्या बळावर शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभे केले आणि राज्यकारभार स्वीकारण्याचा दिवस निश्चित केला. या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांचे राज्य घराण्याच्या नावाने चालले. शिवाजी महाराजांचे राज्य कधीही भोसले घराण्याचे नव्हते. राजे अनेक होऊन गेले असले तरी जनतेच्या अंतःकरणात घर करून राहिलेले शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत.शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ३५० विद्यार्थींनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याचे पासलकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×