scorecardresearch

Premium

अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा टोला; म्हणाले “मालिकेतील घोडी…”

बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती; शिवाजीराव आढळराव पाटलांचा टोला

अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा टोला; म्हणाले “मालिकेतील घोडी…”

अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. त्यांनी केवळ नागरिकांची करमणूक झाली असून मुंबईहून आणलेली ती घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. “ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. पण त्यांनी शब्द पाळलेला नाही. लोकांची फसवणूक केली आहे,” असा निशाण आढळराव पाटलांनी साधला आहे. 

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, “लिंबगाव घाटात नागरिकांची करमणूक झाली. कोल्हे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिलं होतं की, बैलगाडा शर्यत ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी पहिल्या बारीसमोर हा पठ्ठया घोडीवर बसून बारी जिंकेल. पहिली बारी पुणे, नगर जिल्ह्याचा विचार करता ११ आणि १२ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी मावळ आणि आंबेगाव तालुक्यात संपन्न झाल्या आहेत. त्यावेळी हा पठ्ठया कुठे होता हे माहिती नाही. ती खरी पहिली बारी होती”.  

sanjay-raut-on-devendra-fadnavis-and-eknath-shinde
“वाघनखांनी जसा अफजल खानावर हल्ला झाला तसाच शिंदे-फडणवीस सरकारवरही…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
Ichalkaranji
कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक
kiran mane post about farmers situation in state recalls chhatrapati shivaji maharaj old letter
“महाराजांचं नाव फक्त धर्माच्या अंगानं…”, किरण मानेंची छत्रपती शिवरायांच्या ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत पोस्ट; म्हणाले, “शेतकर्‍यांचे हाल…”
eknath shinde imtiyaz jaleel
इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगरातील मोर्चावर शिंदे गटाची टीका; म्हणाले, “हे निजामवाले…”

VIDEO: अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी

पुढे ते म्हणाले की, “पहिली बारी म्हणजे काय? घाटातून सुटलेला पहिला गाडा. आज हे गृहस्थ आले १२ वाजता. तोपर्यंत १०० गाडे पळाले होते. त्यामुळे ही पहिली बारी नाही. शब्द दिला, आश्वासन दिले, नाटकातील शब्दफेकी डायलॉग आहेत. गर्दीला खेचून घेणारे हे डायलॉग आहेत. यात काही तथ्य नाही. ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही. त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. त्यांनी शब्द पाळलेला नाही, लोकांची फसवणूक केली आहे”.

“घोडीवर बसणार असा शब्द दिला होता. बैलगाडाच्या पुढं पळणारी घोडी कशी असते? ती शेतकऱ्यांना माहिती आहे. बैलगाडा पुढं धावणारी घोडी ही वेगळी असते. त्यांनी आणलेली घोडी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमधील होती. तिला स्टुडिओमधून मुंबईतून घेऊन आले होते. ती घोडी धावण्याच्या लायकीची नव्हती. घोडी आणि खासदार बैलांच्या पाठीमागे राहिले आणि बैल पुढे गेले. त्यामुळं ही बारी फसली आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“शब्द पाळला वैगेरे हे थोतांड आहे. ही केवळ नागरिकांची फसवाफसवी आहे. त्यांनी ही नौटंकी थांबवावी. तीन वर्षे झालं लोकांची खूप करमणूक केली आहे. तीन वर्षे त्यांनी नागरिकांची निराशा केली आहे,” असं यावेळी ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “कोल्हे यांची बारी फसली असून हे वरतीमागून घोडं तशी ही बैलामागून घोडी. बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती. मग घोडी पळवायची कशाला? शूटिंग आणि फोटोसाठी, घोडीवर बसायचं होंत का? तसं असत तर शेतकऱ्यांची घोडी आणून बसायचं होतं’.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena shivajirao adahlrao patil on ncp amol kolhe horse riding in bullcart race kjp 91 sgy

First published on: 16-02-2022 at 17:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×