पुणे : विविध उपक्रमांतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा केल्यानंतर आता २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सद्भावना ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. या सततच्या शासकीय उपक्रमांच्या भडिमारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा अधिक वेळ उपक्रमांमध्येच जात असून, विद्यार्थ्यांनी शिकायचे कधी आणि शिक्षकांनी शिकवायचे कधी असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शाळांमध्ये असे उपक्रम राबवण्यात आले. तसेच यंदा फाळणी दु:खद स्मृतिदिनासारख्या उपक्रमाचीही भर पडली होती. आता अल्पसंख्याक विभागाकडून २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस, तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सद्भावना ऐक्य पंधरावडा साजरा करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार २० ऑगस्टला सद्भावना शर्यत, प्रतिज्ञा, सर्वधर्म प्रार्थना आदी उपक्रम, २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीतही वक्तृत्त्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना  उपक्रमांमध्येच जाणार असल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students teachers continuous activities displeasure education sector ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST