scorecardresearch

Premium

साखर कारखानदारांची २०० कोटींची फसवणूक; मुकादम, वाहतूकदारांमुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल

दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते. पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे.

sugar factory owners in Maharashtra
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : राज्यातील साखर कारखानादारांची सुमारे दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून वाहतूकदार आणि मुकादमांशी केलेल्या करारात ही फसवणूक झाली आहे. पण या वादात सामान्य ऊसतोड मजूर वेठीस धरले जात आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते. पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे. कारखाने ऊसतोडणीसाठी थेट ऊसतोडणी मजुरांशी करार करीत नाहीत. मुकादम आणि वाहतूकदारांशी करार करतात. वर्षांनुवर्षे असेच चालत आले आहे. पण अलिकडे बोगस मुकादम आणि वाहतूकदारांचे पेव फुटले आहे. उसाच्या तुटवडय़ामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

ऊसतोडणी मजूर वेठीस

करार मुकादम आणि वाहतूकदारांशी केला असला तरीही सामान्य ऊसतोडणी मजूर वेठीस धरले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूकदाराने फसवणूक केली तर मुकादम आणि मजूर कायद्याच्या कचाटय़ात अडकतात. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांतील अधिवासी ऊसतोडणी मजुरांवर कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकात गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांची वाहने कारखान्यांनी बेकायदा अडवून धरली आहेत.

सामान्य ऊसतोडणी मजूर प्रामाणिकपणे काम करतो. पण, मुकादम आणि वाहतूकदारांकडून आमची फसवणूक होत आहे. यंदा हंगाम सरासरी १२० दिवस चालला, हंगाम १५० दिवस चालला असता तर कदाचित इतका गंभीर प्रश्न निर्माण झाला नसता. पुढील वर्षांपासून कायद्याच्या कसोटीवर टिकतील, जबाबदारी निश्चित होईल, असे करार करण्यात येतील.  – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ

कारखानदारांच्या चुकीचा सामान्य ऊसतोडणी मजुरांना फटका बसतो. विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांकडून कारखानदारांच्या हिताचे संरक्षण केले जाते. मजुरांना मारहाण होणे, डांबून ठेवणे, वाहने जबरदस्तीने अडविणे, असे प्रकार घडत आहेत. या विरोधात १२ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सत्यागृह आंदोलन करणार आहे.  – राजन क्षीरसागर, सरचिटणीस, लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियन (आयटक)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sugar factory owners in maharashtra cheated over rs 200 crore zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×