लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राज्यातील दहावीच्या निकालातून सुमारे आठ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षणाची दिशा आणि समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने यंदापासून घेतला आहे.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
selfie parent letter cm eknath shinde
सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

राज्यात दरवर्षी साधारपणे १८ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. परीक्षेचा निकाल साधारपणे सरासरीने ९२ टक्केच्या जवळपास असतो. त्यामुळे सुमारे ८ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहचण्यास त्यांना अडसर निर्माण होत आहे. विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्यासाठीचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

हेही वाचा… पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग

प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी माध्यमिक स्तरावरील दहावीच्या निकालाचे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या निकालाचे विश्लेषण करून संख्यात्मक दृष्टिकोनातून सर्वाधिक विद्यार्थी किमान अध्ययन क्षमता पातळी प्राप्त करू न शकणान्या शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी तयार करणे, संबंधित शाळांमधील अध्ययन अडसर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिशा, व्यवसाय कौशल्य विकास किंवा अन्य अनुषांगिक उद्बोधनाकरीता शिबिरांचे आयोजन करावे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका उद्बोधन सत्राचे आयोजन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.