उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने या भागातून थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शहरांच्या किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने घट झाली. त्यामुळे राज्यात मंगळवारपासून थंडीचे पुनरागमन झाले आहे. पुढील १५ दिवस राज्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>उच्च शिक्षणाच्या आठ सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर

the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…
BRS in Maharashtra
अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात औरंगाबाद शहराचे किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी नोंदविले गेले. गेले २० दिवस ढगाळ वातावरणामुळे राज्यातील सर्वच शहरांचे किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसवर गेले होते. परिणामी ऐन थंडीत नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, आता ढगाळ वातावरण नाहिसे झाले असून आकाश निरभ्र झाले आहे. तसेच उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्या भागातून थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील शहरांच्या किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

हेही वाचा >>>‘जेईई मुख्य’साठी ७५ टक्क्यांची अट; राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय; विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापुरात गारठा वाढला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिकमध्येही नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि उदगीर, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत पारा घसरला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे मंगळवारचे कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शहर कमाल किमान
औरंगाबाद ३०.८ १०.४
पुणे ३१.३ ११.४
कोल्हापूर ३१.८ १६
सांगली ३२.४ १४.६
सातारा ३०.४ १३.९
मुंबई ३३.२ २३.२
सोलापूर ३३.२ १६.५
रत्नागिरी ३५ १९.३
नाशिक ३०.१ १२.६
नागपूर २९.४ १२.४
जळगाव ३०.६ १२