लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरू आहे. राज्यभरातून लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. मात्र, या सोहळ्या दरम्यान चोरट्यांनी काही भाविकांचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास

सारिका सतीश जोशी (वय ६५, रा. पालघर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी यांची इंद्रायणी घाट आळंदी येथून २९ हजार २०० रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. त्याचबरोबर कल्पना किशोर पाटील यांचे २५०० रुपये आणि एक लाख १० हजार रुपये किमतीचे १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, वैभवी नितीन तांडेल यांचे सहा हजार ५०० रूपये रोख आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, कल्पना किशोर तरे यांची पाच हजार २०० रूपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. या सर्व घटना मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ या कालावधीत घडल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

आणखी वाचा-पुणे : बंदुकीच्या दुकानातून २० काडतुसे, ३२ बोअरची चोरी, दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

दरम्यान, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज,ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीतीने इंद्रायणी नदीकाठ फुलून गेला आहे.

Story img Loader