पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या भागात चार महिलांकडील दोन लाख ३० हजारांचे दागिने लांबविले गेले. येरवडा आणि विश्रांतवाडी भागात या घटना घडल्या.

याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि त्यांच्या परिचित दोन महिला येरवडा येथील इंदिरानगर परिसरात पालखीचे दर्शन घेत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने लांबविले.

विश्रांतवाडी चौकात एका महिलेच्या गळ्यातील ४९ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. पालखी सोहळ्यात दागिने हिसकावण्याच्या चार घटनांमध्ये दोन लाख ३० हजारांचे दागिने लांबविण्यात आले आहेत.