आपल्या समर्थ लेखणीतून विजय तेंडुलकर यांनी मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा बदलला, असे मत ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी व्यक्त केले.
नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘तें’ना अभिवादन करण्यात आले. डॉ. वि. भा. देशपांडे यांनी तेंडुलकरांच्या प्रतिमेचे आणि त्यांच्या साहित्यकृतीचे पूजन केले. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह वि. दा. पिगळे, उद्धव कानडे, बंडा जोशी आणि प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल

प्रयोगशीलता हा तेंडुलकरांच्या लेखनाचा स्वभाव होता, असे सांगून देशपांडे म्हणाले, नाटय़ परंपरेला छेद देताना विषय, आशय आणि आविष्कार यासंदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. भाषेतील विरामचिन्हांचा प्रभावी वापर करणारे ते एकमेव असे यशस्वी नाटककार होते. अशा थोर नाटककाराचे यथोचित स्मारक व्हायला हवे होते. तेंडुलकरांच्या नाटकांचे प्रयोग करून ज्यांनी पैसा आणि प्रसिद्धी मिळविली, त्यांनी सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे स्मारकासाठी पाठपुरावा करायला हवा. आता महाराष्ट्र साहित्य परिषद त्यासाठी पुढाकार घेत आहे ही आनंदाची बाब आहे. जोशी म्हणाले, कोणत्याही चौकटीत बसविता येणार नाहीत अशी तेंडुलकरांची नाटके हा मराठी रंगभूमीवरचा स्वतंत्र प्रकार आहे. तेंडुलकरांनी दिलेले धक्के हे केवळ समाजालाच नव्हे तर मराठी रंगभूमी परंपरेला होते. समाजातील दंभावर त्यांची नाटके प्रहार करतात. त्यांच्या यशाची तुलना करता ललित वाङ्मय क्षेत्रातील तेंडुलकरांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीकडे साहित्य विश्वाचे दुर्लक्षच झाले आहे.

Story img Loader