“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले. पण, कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ झाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून नवीन सरकार तरी हे नियम करणार का?” असा सवाल महाराष्ट्र अंनिसमार्फत मुक्ता दाभोलकर आणि डॅा. हमीद दाभोलकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले आहे म्हणून नातेवाइकांनी मारहाण केल्याने झालेला मृत्यू अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या अंधश्रद्धा विषयक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत अशी अपेक्षा दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will the anti witchcraft laws be enacted maharashtra annis question to the government pune print news msr
First published on: 19-08-2022 at 10:55 IST