पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारवा कायम आहे. बहुतांश भागात रात्रीचे किमान आणि दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या खाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात घट झाल्याने थंडी अवतरली आहे.

आठवड्यापासून राज्यात थंडीचे आगमन झाले आहे. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात थंडीचा कडाका वाढला होता. सध्या तेथील तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी ते सरासरीच्या खाली असल्याने गारवा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागात गारवा कायम आहे. विदर्भात पावसाळी वातावरण होते. काही भागात गारपीटही झाली. मराठवाड्यातही पावसाळी वातावरण होते. त्यामुळे या भागातील रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले होते. मात्र, सध्या सा भागातील पावसाळी वातावरण दूर होऊन थंडी वाढली आहे. उत्तरेकडील काही राज्यांत सध्या थंडीच्या लाटेची आणि थंड दिवसाची स्थिती आहे. मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे. त्यामुळे राज्यातील तापमानातील घट कायम राहिली आहे.

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
maharashtra government, bsc nursing, government colleges, 7 district, 700 seats, increase,
राज्यात नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ७०० जागा वाढणार
new port at murbe marathi news, murbe new port marathi news, vadhavan port marathi news
विश्लेषण : कसे असेल मुरबे येथील नवीन बंदर? वाढवणजवळ दुसरे बंदर कशासाठी?
water supply cut in mumbai
मुंबईवर पाणीकपातीची वेळ का?

मुंबईसह कोकण विभागात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्रषा किंचित अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या खाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घटले आहे. रविवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.