पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरी येथे झालेल्या जाहीर सभेत ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. काेणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गावजत्रा मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यावेळी उपस्थित होते.

Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव

हेही वाचा >>>काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारताचा पाया हा सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं…एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. देशात काँगेसचे सरकार असताना पाकिस्तान भारतात घुसखाेरी करत हाेता. वारंवार घुसखाेरी हाेत हाेती, आतंकवादी हल्ले हाेत हाेते. आतंकवादी कारवायांना काँग्रेसने राेखले नाही. या मुद्द्यावर आवाज उठवू नका, कारण संबंध खराब हाेतील, असे आम्हाला सांगत होते. काँग्रेस देशाच्या किमतीवर पाकिस्तानशी संबंध सुधारत हाेती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ‘हम छेडेंगे नहीं लेकिन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’ असा संदेश जगभरात गेला आहे. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान महायुती आहे.

हेही वाचा >>>“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. सगळ्यांना सुरक्षा आणि काेणामध्येही भेदभाव नाही. भारताला जाेडणारी ताकद महायुतीत आहे, तर महाआघाडी ही महाअनाडी आहे. या महाअनाडीकडे नीती, नियत आणि निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही. परिवाराचा विकास एवढाच यांचा नारा आहे. केवळ काँग्रेसच्या खानदानी परिवाराचा विकास सुरू आहे. अशी टीका याेगी आदित्यनाथ यांनी केली.

विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यास गेल्यानंतर दगडफेक केली जाते. गडावर अतिक्रमण का झाले, अयाेध्या, काशी, मथुरा, १९४७ मध्ये लाखाे हिंदूंची हत्या का झाली, गणेश विसर्जन मिरवणूक, रामनवमी शाेभा यात्रेवर दगडफेक का होत होती, कारण आपण विभागलाे हाेताे. भारताचा पाया सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसने देशहिताचा कधी विचार केला नाही. काँग्रेसला सत्तेची लालसा नसती, तर देशाची फाळणी झाली नसती. निर्दाेष लाखाे हिंदूंची हत्याही झाली नसती. काँग्रेसने फाळणी करून देशाच्या हिताला तिलांजली दिली. स्वातंत्र्यानंतर जाती, क्षेत्र, भाषेच्या आधारे देशाची विभागणी करण्याचे काम काँग्रेसने केले, असे आरोप याेगी आदित्यनाथ यांनी केले. भारताची ताकद वाढल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल. त्यानंतर बलुचिस्तानसह पाकिस्तानचे इतर भाग देशात येतील, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader