घसरलेले तापमान आणि झोंबणारे वारे यांमुळे होणारी अवस्था आजघडीला आपल्या देशात अनेक ठिकाणी दिसू लागलेली आहे.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान बदलाचे दुष्परिणाम काय असतील ते असोत. पण एक सुपरिणाम मात्र निश्चितच नोंदवायला हवा. तो म्हणजे सर्वत्र लांबलेली थंडी. मुंबईत तर ती सध्या इतकी पडलेली आहे की एका मोठय़ा नेत्याच्या म्हणण्यानुसार लवकरच आपल्याकडे हिमअस्वले – पोलर बिअर-  रस्त्यावर हिंडताना दिसतील आणि त्यावरूनही श्रेयवाद सुरू होईल. तर दुसऱ्याच्या मते या थंडीमुळे राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सना माहेरी असल्यासारखे वाटू लागेल आणि मग त्यांना येथे आणण्याच्या निर्णयात किती दूरदृष्टी होती याचे दावे दुसऱ्या बाजूने केले जातील. हे दावे-प्रतिदावे करणाऱ्यांच्या युक्तिवादांत तथ्य असले तरी त्याचे श्रेय मात्र या दोन्ही बाजूंस अजिबात देता येणार नाही. ते जाते हवामान बदलास. त्याचा परिचय करून दिल्यामुळे समस्त भारतवर्षांने हवामान बदलाचे ऋणी राहायला हवे. कारण सर्वसामान्य वातावरणात प्रजासत्ताक कुडकुडते आहे असे म्हटले तर देशद्रोहाचा किंवा गेलाबाजार दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखालच्या गुन्ह्याचा आरोप ठेवला जाण्याची भीती होती. आता ती नाही. या थंडीने कुडकुडत्या प्रजासत्ताकास अत्यंत वास्तववादी अर्थ दिला आहे. त्या वास्तवाच्या पृष्ठभागाखालोन हे प्रजासत्ताक कशाकशावर कुडकुडत असावे बरे याचा शोध घेण्यात तसा काही धोका नसावा. असला तरी तो क्षणभरासाठी बाजूस सारून हे काम तडीस न्यावयास हवे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change in india coldest republic day temprature falls in india zws
First published on: 26-01-2022 at 01:23 IST