राजेश बोबडे

निश्चयाचे बळ हे केवळ साधन नव्हे, तर ते प्रत्यक्ष फळच आहे, या तुकाराम महाराजांच्या वचनाचा उल्लेख करून मानवाला आत्मविश्वासाची आभा वाढविण्याचा मंत्र देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘निश्चय आपला आहे, तो करणारेही आपणच आहोत व त्याचे फळही आपणासच हवे आहे. ही बाजू विसरून आपण उगीच विसरभोळेपणाचे प्रदर्शन करतो, निराळय़ा संकल्पांची धारणा करतो आणि निराळय़ा फळांची अपेक्षा धरतो. उदाहरणार्थ, मी ध्यानाला बसावे पण ‘समोर मूर्ती गुरुदेवाची आणि मनात चिंता मात्र घराची’, असा प्रकार व्हावा, याला जबाबदार कोण? आपण जे काही करू इच्छितो त्याचा निश्चय आपल्या हृदयात दृढ झालेला नसतो, हेच त्याचे कारण. यामुळे आपल्या सर्व वृत्ती एका प्रवाहात समरस होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या आतील सुप्त शक्ती जागृत न झाल्याने त्या कार्यात सफलताही प्राप्त होऊ शकत नाही. ज्या क्षणी आपल्या हृदयातील निश्चय दृढ होतो, त्या क्षणी आपल्या वृत्ती एकात्मतेने काम करू लागतात आणि त्या एकतानतेतून प्रकट होणारी शक्ती आपणास तेव्हाच सफल करू लागते, याचा प्रत्यय कोणासही येऊ शकेल.’’

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
islamic information center marathi news, islam information
माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…

आत्मविश्वाची आभा कशी वाढवायची याबाबत महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांची वृत्ती तर इतकी बहिर्मुख असते, की त्यांना स्वत:ला आपण काय करतो, काय केले पाहिजे आणि ते का, हेच कळत नाही. दुसरीकडे जे दिसेल तेच त्यांना योग्य वाटते. जे जे बघतो तेच करू लागतो, जसे कोणी म्हणेल तसाच बोलू लागतो आणि आपले स्वत्व विसरून इंद्रिये वळवितील तसाच वळत राहतो. असा माणूस आत्मशक्ती कशी प्राप्त करू शकणार? निश्चित धारणा, निश्चय, संयम, तारतम्य व प्रयत्न यांच्या अभावी त्याचे संकल्प निरर्थक ठरतात. माणसाचे आत्मबल कसे वाढत जाते याची उदाहरणे आपण मोठय़ांच्या चरित्रांमधून पाहू शकतो. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, कुणाचेही पुस्तक किंवा कुणाचाही अभ्यास जसाच्या तसा आपल्या कामी पडत नसतो. इतरांच्या अनुभवाचा विचारपूर्वक फायदा करून घेता येणे शक्य आहे, पण त्या भांडवलावर विसंबून आपण उन्नत होऊ शकू असे खात्रीने म्हणता येणार नाही. घरातील आई-बाप किंवा इष्टमित्र यांची तपस्यादेखील आपल्या उपयोगाची नसते; मग परक्या थोर पुरुषाचा वा गुरूचा अभ्यास कामी कसा उपयोगी पडेल? ‘आपुली आपण करा सोडवण’ हे सूत्रच सत्य आहे!’’ असे सांगून महाराज ग्रामगीतेत लिहितात,

    जैसी श्रद्ध, जैसा संकल्प।

       जैसा यत्न, पुण्य, पापरूप।

    तैसाचि जीव होई आपोआप।

       अभ्यासाने तयार।।