सन २०२० च्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे (कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्यासह) आसामी कवी नीलमणि फुकन यांचे नाव देशभर चर्चेत आले खरे, पण आसामी साहित्यरसिकांना त्यांच्याबद्दल नेहमीच ममत्व होते. या कवीने १९ जानेवारी रोजीच अखेरचा श्वास घेतला असला तरी, त्यांच्या ‘अखेरच्या पत्रा’विषयीची उत्कंठा आसामी रसिकांना आजही आहे. अखेर त्या पत्रातून, केवळ फुकन यांचाच साहित्यिकाचा आत्मसन्मान पुन्हा प्रस्थापित व्हावा असे वाटणाऱ्यांची संख्याही मोठी आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

.. हे पत्र अर्थातच मृत्यूच्या कैक वर्षे आधी फुकन यांनी लिहिले, ते सीलबंद करविले आणि ‘माझ्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच ते उघडा’ असेही जाहीर केले. साहित्यिक नित्या बोरा यांच्याकडे हे पत्र सध्या आहे. त्या पत्रातील मजकूर १९७४ साली फुकन यांच्यावर झालेल्या- आणि कालांतराने साधार खोडलासुद्धा गेलेल्या- ‘वाङ्मयचौर्या’च्या आरोपाबद्दल अधिक माहिती देणारा आणि तो खोटा आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडणाराच असणार, अशी खात्री बहुतेकांना आहे. पण पत्र उघडले गेलेले नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnanpith award winner assamese writer nilmoni phukan life information zws
First published on: 01-02-2023 at 05:12 IST