‘गुड्डी’ चित्रपटातील ‘बोल रे पपीहरा’ हे गीत गाणाऱ्या किंवा पं. कुमार गंधर्व यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर गायलेले ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे भावगीत गाणाऱ्या कलावती एवढी ओळखही पुरेशी असणाऱ्या वाणी जयराम यांनी भारतीय चित्रपट आणि ललित संगीताच्या क्षेत्रात केलेले काम सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. परंतु आपल्या आवाजाने अतिशय स्पर्धेच्या जगातही स्वतंत्र ओळख निर्माण करणारी गायिका म्हणून त्यांचे नाव घ्यावेच लागेल. विवाहानंतर मुंबईत येऊन स्थायिक झाल्यानंतर हिंदी चित्रपटांच्या दुनियेला आवाजाच्या एका नव्या पोताची ओळख झाली. ज्या संगीतकारांना ते समजून आले, अशा वसंत देसाई यांच्यासारख्यांनी त्याचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हमको मन की शक्ती देना’ या प्रार्थनागीताने त्यांची ओळख घराघरांत पोहोचली आणि वाणी जयराम हे नाव झळकायला लागले. पतियाळा घराण्याची रीतसर तालीम घेऊनही त्यांनी ललित संगीताची वाट धरली आणि त्यामध्ये तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड या भाषांतील सुमारे एक हजार चित्रपटांसाठी पार्श्वगायनकेले. तेथील त्यांची कामगिरी अतिशय लक्षणीय ठरली, याचे भान मराठी रसिकांना असणे शक्य नसले, तरी त्यांनाही, भावगीताच्या विश्वात रममाण करण्याचे काम वाणी जयराम यांनी केलेच. एकोणीस भाषांमध्ये गायलेली दहा हजारांहून अधिक चित्रपट गीते, हजारो भक्तिगीते, स्वतंत्रपणे गायलेली गीते, सर्वोत्कृष्ट गायनासाठी तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांचे पुरस्कार आणि २०१७मध्ये ‘नाफा’चा न्यूयॉर्कमध्ये मिळालेला सन्मान, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. मुंबईत वास्तव्यास असूनही महाराष्ट्राने त्यांना जाहीरपणे गौरविण्यात कसूरच केली. तमिळनाडूत जन्मलेल्या वाणी जयराम यांना लहान वयातच मुथुस्वामी दीक्षितार यांच्या रचनांचे आणि नंतर कर्नाटक संगीताचे रीतसर शिक्षण मिळाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary singer vani jairam profile zws
First published on: 06-02-2023 at 03:05 IST