‘वा, रामदासभाई. अगदी योग्य वेळी स्पष्ट बोलून तुम्ही कोंडी फोडलीच शेवटी’ असे अभिनंदनाचे दूरध्वनी घेत आठवले संसदेतून बंगल्यावर परतले तेव्हा जाम खुशीत होते. फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे स्पष्टपणे सांगितल्याने शिंदे चिडले असतील पण चिडू देत त्यांना. शेवटी आपल्यासाठी दिल्लीतले चाणक्य महत्त्वाचे. पहिल्यांदा त्यांनी आपल्यावर अशी महत्त्वाची कामगिरी सोपवली व आपण ती उत्तमपणे पार पाडली. खूप काळानंतर का होईना पण गांभीर्याने घ्यायला लागले आपल्याला, असे मनाशी म्हणत ते खुर्चीत बसले. चहा घेऊन आलेल्या नोकराची दृष्टीसुद्धा बदललेली, हे लक्षात येताच ते सुखावले. मग नेहमीप्रमाणे डोळे मिटून ते विचार करू लागले. मित्रपक्षाच्या नेत्यांच्या बुद्धीचा वापर करून घेण्यात भाजपएवढे कुणीही माहीर नाही. आपले वक्तव्य वाहिन्यांवरून प्रसारित होताच तिकडे राज्यात बरीच खळबळ उडाली. शिंदेच हवेत असा हट्ट धरणाऱ्या सेनानेत्यांच्या बोलण्यातला जोश गायब झाला. भाजपच्या झाडून साऱ्या नेत्यांनी आनंदित होत फोन केले. आता आपली वाटचाल आणखी सुकर होणार हे निश्चित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा