अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धिवादी मंडळींनी विनोबांच्या कार्याबद्दल असंख्य शंकाकुशंका घेतल्या तरी सामान्य भारतीय जनतेने भूदानावर अलोट प्रेम केले. खरे तर शंका सामान्य माणसांनी घ्यायला हवी होती. कारण नुसते मागून जमीन मिळत नाही. बांध इकडचा तिकडे केला एवढय़ाच कारणावरून एकमेकांचा जीव घेणाऱ्या या देशात केवळ आवाहन करून जमीन मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे, हा त्यांचा आजवरचा अनुभव होता. अशा स्थितीत सामान्यजन भूदानाचे स्वागत करत आहेत आणि ज्यांचा ग्रामीण जीवन पद्धतीशी संबंध नाही अशी मंडळी नानाविध आक्षेप घेत आहेत, असे काहीसे विपरीत चित्र उभे राहिले. बुद्धिवाद्यांना विनोबांचे एक बलस्थान समजले नाही. त्यांना भारतीय जनतेची मानसिकता पुरेपूर ज्ञात होती.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog bhoodan movement by acharya vinoba bhave
First published on: 05-09-2022 at 02:18 IST