आयुर्विमा महामंडळाकडे व्यावसायिक व्यवस्थापनाची वानवा नाही, मात्र सरकारच्या सूचनावजा आदेशांना जुमानू नये इतकी स्वायत्तताही नाही हेही तितकेच खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यभाग कसाबसा उरकला गेला की त्यातून चांगले काही घडलेले दिसेल या अपेक्षेला मुरड घालणेही ओघाने आलेच. मोठी समृद्धी आणि अर्थ-लौकिक असलेले भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आणि तिचे गुंतवणूकदार नेमका याचाच अनुभव सध्या घेत आहेत. बाजारच झोपला असताना प्रारंभिक समभाग विक्रीचा न पेलवणारा उपचार उरकला गेला आणि आज समभागांच्या सूचिबद्धतेला वर्ष उलटल्यावरही भागधारकांनी हात चोळत बसावे अशी ही एकंदर स्थिती आहे. आयुर्विमा महामंडळातील गुंतवणुकीचे मूल्य किती घसरले याचा हिशेब येथे मांडायचा हेतू नाही. समभागांच्या किमतीत वर्षभरात निरंतर सुरू राहिलेली घसरण पाहता, ज्याचा त्याला तो मांडता येणे सहज शक्य आहे. शिवाय कोणी म्हणेल की, हे नुकसान तूर्त अनुमानितच आणि सबुरीने घेतले तर पुढे जाऊन ते लाभात परिवर्तित होईलदेखील. पण या तांत्रिक बाबी बाजूला केल्या तरी प्रश्न उरतोच की, हे नुकसान का, कशामुळे आणि नेमके कुणाचे? किंबहुना आयुर्विमा महामंडळासारख्या समृद्ध आणि महाकाय गुंतवणूकदार संस्थेवर अशी पाळी का यावी? याचा विचार यानिमित्ताने व्हायला हवा. सरकारच्या भूमिकेबद्दलही प्रश्न निर्माण होतोच. किंबहुना लाखाचे बारा हजार बनवण्याची ही हिकमत आयुर्विमा व अन्य महामंडळे आणि उपक्रमाबाबत सरकारने इतक्यांदा सिद्ध करून दाखवली आहे की तो अपवाद नव्हे तर नियमच बनून गेल्याचे वाटावे.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on lic ipo lic stock price dropped lic investors suffer mega loss zws
First published on: 19-05-2023 at 03:38 IST