नेतृत्व खुरटलेले असते तेव्हा समाजातील सर्व दुर्गुणांच्या विषाणूंची त्यास बाधा होते. मणिपूर हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना केंद्र सरकारने घरी पाठवायला हवे. साधे लोकप्रतिनिधी म्हणूनही स्वपक्षात बाळगण्याच्या लायकीच्या नसलेल्या या व्यक्तीस भाजपने मुख्यमंत्रीपदी बसवले असून त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्याची जी ससेहोलपट सुरू आहे ती पाहता बिरेन सिंह यांच्या हाती नारळ देणेच योग्य. वांशिक दंगलींनी मणिपूर पेटले त्यास आता महिना होईल. पण वांशिक मतभेदांची आग मिटवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणवून घेणारा हा इसम प्रत्यक्षात त्या आगीत तेल ओतताना दिसतो. आता तर परिस्थिती इतकी बिकट की प्रक्षुब्ध नागरिकांनी सरकारी शस्त्रागारांवर हल्ले करून शेकडो बंदुका आणि काडतुसे पळवली आणि खुद्द लष्करावरही हल्ले झाले. तरीही या मुख्यमंत्र्यास त्याची चाड नाही. हे गृहस्थ स्वपक्षीय नसते तर भाजपने काय आणि किती थयथयाट केला असता याची कल्पनाही करवत नाही. शेवटी या स्वपक्षीय मुख्यमंत्र्याची लाज राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मणिपुरात तळ ठोकून बसण्याची वेळ आली. पण त्याने भागणारे नाही. शहा माघारी परतल्यावर मणिपुरात सर्व काही आलबेल होईल असे काही नाही. इतका निराशावादी सूर लावण्याचे कारण म्हणजे वास्तवास न भिडताच मलमपट्टी करण्याचा आणि तंदुरुस्ती मिरवण्याचा या सरकारचा सोस. आपणास सर्व काही साध्य आहे आणि चीन, पाकिस्तानसह सर्व समस्या आपण चुटकीसरशी सोडवू शकतो, असे मानण्याइतक्या अवास्तव स्वप्नरंजनात एखाद्यास राहावयाचे असेल तर कोण काय करणार? मणिपूरपलीकडील म्यानमारमध्ये अस्थिरता आहे आणि तेथील स्थलांतरित मणिपुरात आश्रयास येत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या सीमावर्ती राज्यातील परिस्थिती अधिकच गंभीर आणि म्हणून दखलपात्र ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur chief minister n biren singh should resign from the central government amy
First published on: 31-05-2023 at 00:16 IST