अविनाश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय शेती संपूर्णपणे निसर्ग आणि सत्ताधाऱ्यांच्या लहरीपणावर अवलंबून असते, असे म्हटले जाते. त्यातही कांदा उत्पादकांना या लहरीपणाचा अनुभव कायमच येतो. यंदाचे वर्षही त्यास अपवाद ठरलेले नाही. देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना गडगडणाऱ्या दरामुळे दरवर्षी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलनांची मालिका सुरू झाली असून कांद्याचे दर कधी वाढतील आणि आंदोलने कधी थांबतील, हे सांगणे सध्या तरी अवघड झाले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत कांद्याचे दर सहसा शेतकऱ्यांना परवडणारे असतात; परंतु हे वर्ष त्यास अपवाद ठरले. चाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर साठविलेला माल, इतर राज्यांमध्येही आता बऱ्यापैकी कांदा उत्पादन होऊ लागल्याने देशांतर्गत महाराष्ट्राच्या कांद्यास कमी झालेली मागणी, निर्यातीसाठी ठरावीक देशांवरच अवलंबून राहण्याचे धोरण, अशी काही कारणे यामागे आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion problem in maharashtra price and sell issue asj
First published on: 25-11-2022 at 10:27 IST